Saturday, December 12, 2009

नाशिबातले तारे!

याचा शनि त्याच्या मागे, या राशीला साडेसाती, राहु ची दशा, केतु ची दृष्टी , मुलीच्या पत्रिकेतील अमंगल करणारा मंगळ आणि बरच काही .... हे आणि अनेक दाखले आपण ज्योतिष्याच्याकडुन एकत असतो ... पण ही सगळी ग्रह मंडळी का आणि कशी पत्रिकेत येतात आपल्याला त्याचा विचार करण्याची काहीच गरज नसते.
कारण आपण आपल नशीब आपल्या हातानेच घडवायला हव! मीही याच मताची आहे पण मग पत्रिका काय आहे?
मला विचाराल तर आपला कसा मित्रपरिवार असतो तसाच पृथ्विचाही आहे.हे सगळे ग्रह याच मोठ्या मित्रपरिवारातले आहेत.पत्रिकेत एकुण बारा भाग असतात.आपल्या आयुष्याचे महत्वाच्या पडावाचे हे दर्शक आहेत.आपल्या बाहेरील जगाला दिसणारा चेहरा, रूप, स्वभाव यापासून ते आपल मन, त्यातील सुप्त इच्छा, आपल्या भोवातीची जिवाभावाची माणसे, मित्रपरिवार,समोर येणारी संकटे, त्यातून लढण्याची मानसिकता, मनाचा ठाव घेणारे छान विसाव्याचे क्षण , श्रद्धा स्थान आणि बरच काही......
आपले काही मित्र खुप गंभीर असतात ,काही मनापासून आपल्या जवळ असतात, काही शीघ्र-कोपी, काही शांत, काही निखळ हसवणारे तर कोणी समजुतदार ,म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृति .ग्रहांनाही असे स्वभाव असतात बरका,किंबहुना ग्रह या स्वभावांच्या छठा आहेत.मी आधी सांगितल्याप्रमाणे आयुष्यातील कुठल्या महत्वाच्या पडावावर कोणता मित्र/ग्रह भेटतो त्यावर आपल भविष्य ज्योतिषी सांगतो.अर्थात याला अजुन बराच सखोल आभ्यास आणि तर्क याची साथ असावी लगते.
चला एक उदहारण बघुयात .आपल्या पत्रिकेतील पहिल घर तुमचा मुळ स्वभाव कसा आहे आणि तुम्ही जगाला कसे वाटता याबद्दल माहिती सांगतो.समजा तुमच्या पहिल्या घरात मंगळ हा ग्रह आहे.मंगळ याचा स्वभाव तापट, पराक्रमी, शीघ्र निर्णय घेणारा असा आहे. सहाजिकच अश्या वक्ती लोकांना कधी कधी वर्चस्व गाजवणारया वाटु शकतात, त्यांचा शारीर बान्धाही सुरेख असतो, एखाद्या पराक्रमी माणसाला शोभेल असाच.
पण हा खुपच प्राथमिक अंदाज झाला.मुळत: ग्रह कोणत्या राशीत आहे हेही तेवढेच महत्वाचे असते.वाघाला जंगलात सोडले आणि तोच वाघ पिंजर्यात ठेवला तर वाघ तोच असुनही परिस्थिती बदलते.तसेच नुसताच पराक्रमी मंगळ ग्रह असुन नाही चालणार तर त्याच्या गुणान्ना वाव देणारी परिस्थिती/राशीत तो असायला हवा।
चित्रकार जसा आधी नुसत्या कोरया कागदावर रेषा मारतो,मग त्याला आकर देतो, विविध रंग भरतो आणि आधी नुसता कोरा कागद वाटत असलेल्या कगादावरही जिवंत देखावा निर्माण करतो तसच पत्रिकेच आहे.आपल्याच आयुष्याच जिवंत चित्र यात कोरलेल असत.कोणाला ते कळत कोणाला नाही.खर, खोट, सत्य, भास याच्या पलीकडे जाऊन स्वत:ला समजण्याची संधी आपल्याला आयुष्यात मिळावी यासाठीही ज्योतिष शास्त्राची निर्मिती झाली असावी.असे माझे मत आहे।
अर्थात आपल्या ध्येयाकडे अधिक विश्वास ठेवत आणि ज्योतिष हा एक आधार आहे सर्वस्व नाही हे लोकांनी लक्षात घेतल तर मग आपल्या नशिबाचे तारे चमकतच राहतील :)


Friday, October 2, 2009

अनमोल नाती भाग-2

पहिली नोकरी, नविन जागा, मोजके ओळखीचे चेहरे आणि शुन्य काम! फ़ोन वर बोलताना कोणी पाहिलं तर? पर्सनल मेल वाचताना नेमका बॉस तिथे आला तर? सगळे काम करतात आणि आपण असे रिकाम टेकडे आहोत हा विचार सुरवातीच्या काही महिन्यांसाठी फारच काळजीचाच विषय होता माझ्यासाठी... (आता काम नसेल तरी आपण फार व्यस्त आहोत हे दाखविण्यात कोणी माझा हात पकडू शकत नाही ही गोष्ट वेगळी ;-) )
यासाठी मी दिवसातून फक्त canteen टाइम ची वाट बघायचे कारण याच वेळेत मी शांत पणे संदीप खरे लिखित कविता वाचू शकत होते...तेवढाच काय तो मनाला तजेला मिळायचा!

एका अश्याच संध्याकाळी मी canteen मध्ये कविता वाचण्यात मग्न होते...

"संदीप खरेची ' करार ' ही कविता वाचली आहेस का तु?"

मध्यम उंची, चष्म्यातुन बोलणारे डोळे, कुरळे केस आणि हा प्रश्न किती महत्वाचा आहे असा संगणारा चहरयावारिल भाव !

मला पहिल्यांदा समजलच नाही कोण हा? मी या कंपनी मध्ये नोकरी करणार म्हणुन , मी इथे join होण्या आधीच खुप जणांनी माझा अमुक अमुक तिथेच असतो, अस सांगुन बरयाच जणांची नावे सांगितली होती... तो हाच तर नसेल असे म्हणुन मी बरेच दाखले त्याच्या चेहरयाशी जुळवुन पाहिले पण छे प्रश्न तोच.... कोण हा? अश्या वेळी माझा चेहराच जास्त बोलतो बहुतेक

" 'अमुक अमुक ' नाव आहे माझ, मी संदीप खरे चा खुप मोठा fan आहे, मला त्याच्या जवळपास सर्व कविता पाठ आहेत.... तु जे आत्ता पुस्तक वाचातियास ना ते मी खुप वेळा वाचले आहे....'करार' नावाची त्यातील माझी आवडती कविता आहे...म्हणुन विचारल वाचालिस का तु ती कविता?"

माझ्या प्रति उत्तराची वाट न बघताच तो अजुन बोलतच होता..

" GET वाटत... म्हणुनच अशी शांत आहेस तु... मी अमुक अमुक डिपार्टमेन्ट मध्ये आहे ...हा माझा extn number ...काही मदत लागली तर सांग मला... चल bye "

मी या एकेरी सम्भाषणात फक्त एक स्मित हास्य एवढच काय ते योगदान देऊ शकले!
या प्रसंगाला मी 'माझा बहुतेक GET म्हणुन बकरा केला असेल कोणी तरी ' अस समजुन विसरुनही गेले

पण त्याने मला चांगलच लक्षात ठेवल होत..कुठेही भेटला की तो संदीप खरेच्या नविन कवितान्बद्दल मनामोकळे पणे बोलायचा... नविन अर्थपूर्ण कविता मिळाली की फॉरवर्ड करायाचा... या देवाण-घेवाणीच्या प्रवासात आम्ही खुप छान मैत्री जपली...

आज आमच्या मैत्रीला जवळपास वर्षे पूर्ण झाली आहेत. या संदीप खरे fan ने सिंगापुर मध्ये आपल्या पत्नीसह सुखाने संसार थाटला आहे... पण अजुनही त्याचे कविते वरचे आणि संदीप खरेच्या शब्दान वरचे प्रेम कमी झालेले नाही... त्याचं ईमेल आलं की ओळखाव संदीप खरेची नविन कविता आली आहे .... शब्दांची जेवढी त्याला जाण आहे तेवढीच मैत्रीची सुद्धा... म्हणुन मला आमच्या मैत्रीवर या अनमोल नात्याबद्दल सार्थ अभिमान आहे...

नकळत आमच्या मैत्रीची कविता रचणारया संदीप खरे चा विजय असो :)

Monday, September 28, 2009

अनमोल नाती भाग-१

किती नाती आपण सहजच जोडतो ,अगदी आपल्याही नकळत..
अशीच माझ्या आयुष्यातील काही नाती..

मी अस एकले आहे की आपल्या जन्मभराच्या साथीदाराशी आपली स्वर्गातच रेशीम गाठ बांधलेली असते
पण मला वाटतं आयुष्यामध्ये जुळणारं प्रत्येक नातं वरुनच ठरलेल असत!
आपला आयुष्याचा प्रवास हा आधीच ठरलेला असतो..

माझ्या बाबांची सारखी बदली होत असे त्यामुळे, मी तस १२ गावचे पाणी प्यायले आहे :)
दर १-२ वर्षांनी नविन लोक, नविन शाळा याची मला सवय झाली होती.
या सर्व प्रवासा दरम्यान खुप छान नाती मिळाली..अगदी अस्सल मातिमधाली..थेट मनाला भिडणारी!

पण त्याहून छान आणि मजेशीर नाती मला इथे पुण्यामध्ये गवसली.
मी इथे सुरवातीला एकटीच आले.. इंजीनियरिंग (B.E.) करण्यासाठी ..
पण जसे दिवस सरत होते तशी माझ्याशी अनेक नाती जुळत होती

मी paying guest असुनही आपल्याच मुलीसारखे वागवणारे,
गणपति आले की मोदक खायला हक्काने बोलवणारे,
मस्त पावसामध्ये चिम्ब भिजलो की गरमा गरम भजी देणारे ,
असे माझे घर मालक आणि लाडके काका काकू होते.
त्यांच्या घरी मी भाड़े देऊन रहात असले तरी बदल्यात पैश्यामध्ये न मोजता येणारे भरभरून प्रेम मला मिळाले

खानावळीमध्ये सर्वांपासून लपवून मला रोज काही ना काही खाऊ देणारया काकू,
बासरीचा सराव करता करता मला सुर भेट देणारे काका,
एकटेपणा आतून रडू लागला की नकळत हसवणारा मित्र परिवार!
पावसाचे थेम्ब झेलत माझ्या सोबत झुलणारा झोका!

मनाच्या कुपित साठवून ठेवावेत असे अनेक क्षण या लोकांनी मला दिले

आज मी इथे एकटी नाही. माझ कुटुंब माझ्या सोबत आहे..
पण मागे वळुन आयुष्याकडे पाहिल की वाटतं देवाला मनापासून धन्यवाद म्हणाव
किती समृद्ध केले आहे त्याने माझं भाव-विश्व या अनमोल नात्यांन्नी !