Monday, January 10, 2011

काही ओळखीचे अनोळखी

नविन वर्ष सुरु झाले तेव्हा ठरवले होते रोज योग-साधना करायची.म्हणता-म्हणता ९-१० दिवस उलटून गेले आणि आज एकदा योगाचा श्रीगणेशा केला.शरीरात एवढी हाडे-अवयव फक्त योगासाठीच दिले आहेत या आवेशात केलेले योगाचे प्रकार आत्ता स्वस्थ बसल्यावर चांगलेच जाणवत आहे!
असो, शवासन या सुखद आसनासाठी गच्चीवर आम्ही सुस्त पडलो होतो. शामल-निळसर-धूसर थंडीमध्ये अशी संध्याकाळ चंद्रकोर घेउन नटली होती. थंडगार वारे चारही दिशांमध्ये बागडत होते.एक मऊ रजई अंगावर ओढावी आणि मस्त झोप काढावी असे वाटत होते.पण तेवढ्यात आकाशातील एक चांदणी लुक्लुकली.तिच्या शेजारी पाहिले तर सप्तरुशी समूह दिसला.लहानपणी आजोबा गच्चीवर घेउन गेले की या चांदण्यांची गोष्ट सांगायचे.कधी नक्षत्रांची रास तर कधी चंदोमामाची बात.मनाची अनेक कवाडे उघडली आणि मग काय चान्दोमामाच्या गावातून एक चक्कर झाली.घरी येताना मनात याच गोष्टी रेंगाळत होत्या।
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण किती सुन्दर गोष्टी सहज दुर्लक्षित करतो, असे वाटुन गेले.रत्यावर गाड़ी चालवताना संध्याकालची वेळ आहे, प्रचंड गर्दी अश्यवेली आपण किती चिडचिड करतो.पण कधी एक नजर वर करून त्या रोज नविन रूप घेउन येत असणाऱ्या चंद्राकड़े आपली नजर जात नाही.सकाळी रोज एकाच वाटेवर दिसणार्या मंदिरा समोरील सुगन्धित सुरेख फुलांनी सजवलेल्या दुकनान्कडे नजर फिरकत ही नाही.रोज ईमेल लिहिताना घरी काही जपून ठेवलेल्या पत्रांची,कविता-गोष्टीच्या पुस्तकांची आठवन येत नाही।
कधी जुने एल्बम काढून लहानपणीच्या दुनियेची सफ़र होत नाही.धूल खात पडलेल्या जुन्या फाइल मधील शालेय प्रशस्ति-पत्रकांची नुसती नंतर राद्दीच वाटते.पण खरतर किती आठवणी दडलेल्या असतात या मागे.
कदाचित यशामागे धावता धावता असे ओळखीचे अनेक जीवनाचे अनुभव कधी अनोळखी होतात हे कळतच नाही।
लोक म्हणतात इतिहासात जगु नये पण जगणारा प्रत्येक क्षण आज न उद्या जुना होणारच आहे।कधीतरी वेळ काढून मागे वळुन हेही पहाव की आपुल्या पाउलखुणान्नी किती रस्ते सजले आहेत.