पहाटे ४ वाजले होते, मुसळधार पाऊस पडत होता, सुसाट वारा झाडांच्या फांद्यातून पाने उडवत होता. काही घरे शांत झोपली होती, काही खिडक्या वाजत होत्या. टीम टीमणारे दिवे काळोख पुसत होते. विजांची दिशा व्यापत आकशामध्ये थैमान घालत होत्या. गावातील शांतता आता वादळाने भंग केली होती आणि वेशी पाशी असणारया मंदिरातील दिव्याची ज्योती मंदपणे झळकत सगळा पाहत होती . कच्चे रस्ते पाचोळा, माती वाहत घेऊन पाण्याच्या धारा नदीकडे धावत होत्या. मोठी झाडे मोडून पडली होती आणि फुलांची आरास अंगणामध्ये होत. त्यातून वाट काढत थरथर कापत एक सावली दारापाशी आली, आडोसा बघून पायरीवर विसावली.
ढगांचा मनसोक्त पाण्याशी खेळ झाला आणि स्वारी आकाशातून वारा नेईल तिकडे निघून गेली . एव्हाना सुर्य प्रकाश घेऊन ओल्या जगाला सोनेरी करून गेला होता. ती साखर झोपेतून जागी झाली. रोजच्या दिन क्रमाप्रमाणे कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत जमिनीला नमस्कार केला. तेवढ्यात दाराची बेल वाजली "दूधवाला आला असेल, त्याला सांगायचे होते आज जरा जास्त दुध हवे". सोमवार, शिवाच्या मंदिरात जाऊन दुधाचा अभिषेक करायचा कधी विसरली नाही ती.
आजी : "बर आहे न सगळा नाम्या , वेळ लावला आज यायला " दूधवाल्याला आपुलकीने विचारले.
दूधवाला नाम्या : " अव काय सांगायचा, लई थैमान घातलाय पावसान रातच्याला, तुमचा सोमवार हाय नव्ह आलो बघा दुध द्यायला वाट काढत".
आजी: "खुश रहा बाळ " तिने कौतुक केले
नाम्या : "काय आजी, पावन आल्यात दिसतंय. पण हित दाराभाहीर काय म्हणून झोपवलय?" पायरी वर अंग चोरून झोपलेल्या व्यक्ती कडे बोट करत नाम्याने आजीला विचारले
आजी: " कोण आहे तिकडे?" आजीने आवाजाला काळजीचा सूर लावत विचारले
"मी हाय जी, माती" डोळे चोळत वर बघत व्यक्तीने उत्तर दिले.
आजी: "माती ? अग बाळ, नाव विचारले मी तुझे. काल पावसात रस्ता चुकलीस का?"
माती: " माती नाव हाय जी माज. पोरटी नग व्हती जी बापाला, म्हणून माईन नाव ठेवलयजी. ती म्हणायची धरणी सामद्यांची आय असते. तुले तिच्या कडे राहावे लागेल. बाप तर नाई ठेऊन घेणार घराला. रातच्याला लई पाणी बरसले जी म्हणून हितच निवारा घेतला जी. निघतो आता" अस म्हणत माती चटकन उठली. विस्कटलेले केस कसेबसे सावरले आणि गाठोडे घेतले.
आजी: " बरच बोलतेस ग एवढ्याश्या वयामध्ये , कुठे जाणार एकटी ?चहा घेऊन जा हो घोटभर" आजीने प्रेमाने हात फिरवला मातीच्या डोक्यावरून.
माती: " मी? म्होरल्या शालेला जाणार है जी. शाला झाडतो जी म्या. गुरुजी मला मग गणित शिकावित्यात ५ वी तुकडीच"
आजी: "अरे वाह! चल मग सांग बघू ४ गुणिले ५ किती?" आजीने मातीची फिरकी घ्यायला प्रश्न केला
माती: "सोप्पा हाई कि, २० आणि काय! पाढ पाठ केल्याविना जेवत नाई." समोरचे दोन तुटलेले दात लपवत माती गालात हसली.
आजी: "शाब्बास! माझ्याकडे बाजाराचे काम करणार का? तुला शाळेचा गणवेश आणि पुस्तके मी घेऊन देईन" आजीने विचारले
माती: "व्हय जी" अस म्हणत माती उड्या मारत अंगणभर नाचली
आजीने मातीला परिसाचा स्पर्श करावा तसे सोनेरी संस्कार दिले. तिला खूप शिकविले अगदी तिच्या इतर नातवंडानचे जसे लाड करते तसेच. मातीचे १० चे शिक्षण पूर्ण झाले तिने आजीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
आजी: "खुश रहा पोरी. अशीच यशस्वी हो"
माती: " आजी आज गेली ५ वर्ष तू माझा सांभाळ करतेस. तुला एक विचारू का?" मातीने आवाजाला आदराची समज देऊन परवानगी मागितली
आजी: "विचार न बाळ."
माती : "आजी तुझी एवढी मुले कशी सांभाळतेस ग? तू माझे नाव मातीच का राहू दिलेस?" एकाच श्वासात माती ने सगळे प्रश्न विचाराचे ठरवले होते
आजी: " माती, नाव हि आपली ओळख नसते, आपण नावाला ओळख देतो. आपली वागणूक, आपली विचारसारणी याने नावाला परिपूर्णता मिळते. तुझ्या वडिलांना तू मुलगी म्हणून नको होतीस. तुझ्या आईला तूला जगताना पहायची ओढ होती. तिने तुला जे नाव दिले त्या नावाने आजही ती तुला ओळखावी आणि तिच्या स्वप्नांना पूर्णता मिळावी. हीच माझी इच्छा होती. माती, यासाठीच मी तुझे नाव नाही बदलले.
आपले मुल ज्या दिशेने धावते ती आईसाठी प्रकाशाची दिशा असते. मुल दिसानसे झाले कि मागे उरतो तो फक्त काळोख." मोठा नि:श्वास सोडत आजी एक क्षण थांबली आणि परत सांगू लागली "माझा प्रकाश एका वादळात हरवून गेला. शेवटचे पहिले तेव्हा तुझ्याच वयाची असतील माझी मुले." आजीच्या डोळ्यातून पाणी आले. माती पुढे आली आपला आधार द्यायला. आजी म्हणाली" आपण एकटेच असतो, पण फ़क़्त तोपर्यंत जोपर्यंत आपण कोणाचा एकटेपणा दूर करत नाही." अश्रू लपवत पुढे म्हणाली" ज्या क्षणी मी एकटी झाले त्या क्षणी मी ठरवले, कोणालाही मायेची गरज आहे त्यांना हात द्यायचा. बघत बघत अनेक मुले जोडली गेली. आता ती सारी शिकून मोठी झाली आहेत. आज बघ माझा हात तुझ्या हाती आणि तुझे हात अजून कोणाच्या हाती देशील तर जग प्रेमाने भरून जाईल"
मातीने आजीला वचन दिले कि ती तिच्यातील माणुसकी जपेल. माणुसकीला प्रेमाने गुणले आणि व्देशाला मायेने भागले तर जग कित्ती सुंदर होईल, हो न?
ढगांचा मनसोक्त पाण्याशी खेळ झाला आणि स्वारी आकाशातून वारा नेईल तिकडे निघून गेली . एव्हाना सुर्य प्रकाश घेऊन ओल्या जगाला सोनेरी करून गेला होता. ती साखर झोपेतून जागी झाली. रोजच्या दिन क्रमाप्रमाणे कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत जमिनीला नमस्कार केला. तेवढ्यात दाराची बेल वाजली "दूधवाला आला असेल, त्याला सांगायचे होते आज जरा जास्त दुध हवे". सोमवार, शिवाच्या मंदिरात जाऊन दुधाचा अभिषेक करायचा कधी विसरली नाही ती.
आजी : "बर आहे न सगळा नाम्या , वेळ लावला आज यायला " दूधवाल्याला आपुलकीने विचारले.
दूधवाला नाम्या : " अव काय सांगायचा, लई थैमान घातलाय पावसान रातच्याला, तुमचा सोमवार हाय नव्ह आलो बघा दुध द्यायला वाट काढत".
आजी: "खुश रहा बाळ " तिने कौतुक केले
नाम्या : "काय आजी, पावन आल्यात दिसतंय. पण हित दाराभाहीर काय म्हणून झोपवलय?" पायरी वर अंग चोरून झोपलेल्या व्यक्ती कडे बोट करत नाम्याने आजीला विचारले
आजी: " कोण आहे तिकडे?" आजीने आवाजाला काळजीचा सूर लावत विचारले
"मी हाय जी, माती" डोळे चोळत वर बघत व्यक्तीने उत्तर दिले.
आजी: "माती ? अग बाळ, नाव विचारले मी तुझे. काल पावसात रस्ता चुकलीस का?"
माती: " माती नाव हाय जी माज. पोरटी नग व्हती जी बापाला, म्हणून माईन नाव ठेवलयजी. ती म्हणायची धरणी सामद्यांची आय असते. तुले तिच्या कडे राहावे लागेल. बाप तर नाई ठेऊन घेणार घराला. रातच्याला लई पाणी बरसले जी म्हणून हितच निवारा घेतला जी. निघतो आता" अस म्हणत माती चटकन उठली. विस्कटलेले केस कसेबसे सावरले आणि गाठोडे घेतले.
आजी: " बरच बोलतेस ग एवढ्याश्या वयामध्ये , कुठे जाणार एकटी ?चहा घेऊन जा हो घोटभर" आजीने प्रेमाने हात फिरवला मातीच्या डोक्यावरून.
माती: " मी? म्होरल्या शालेला जाणार है जी. शाला झाडतो जी म्या. गुरुजी मला मग गणित शिकावित्यात ५ वी तुकडीच"
आजी: "अरे वाह! चल मग सांग बघू ४ गुणिले ५ किती?" आजीने मातीची फिरकी घ्यायला प्रश्न केला
माती: "सोप्पा हाई कि, २० आणि काय! पाढ पाठ केल्याविना जेवत नाई." समोरचे दोन तुटलेले दात लपवत माती गालात हसली.
आजी: "शाब्बास! माझ्याकडे बाजाराचे काम करणार का? तुला शाळेचा गणवेश आणि पुस्तके मी घेऊन देईन" आजीने विचारले
माती: "व्हय जी" अस म्हणत माती उड्या मारत अंगणभर नाचली
आजीने मातीला परिसाचा स्पर्श करावा तसे सोनेरी संस्कार दिले. तिला खूप शिकविले अगदी तिच्या इतर नातवंडानचे जसे लाड करते तसेच. मातीचे १० चे शिक्षण पूर्ण झाले तिने आजीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला.
आजी: "खुश रहा पोरी. अशीच यशस्वी हो"
माती: " आजी आज गेली ५ वर्ष तू माझा सांभाळ करतेस. तुला एक विचारू का?" मातीने आवाजाला आदराची समज देऊन परवानगी मागितली
आजी: "विचार न बाळ."
माती : "आजी तुझी एवढी मुले कशी सांभाळतेस ग? तू माझे नाव मातीच का राहू दिलेस?" एकाच श्वासात माती ने सगळे प्रश्न विचाराचे ठरवले होते
आजी: " माती, नाव हि आपली ओळख नसते, आपण नावाला ओळख देतो. आपली वागणूक, आपली विचारसारणी याने नावाला परिपूर्णता मिळते. तुझ्या वडिलांना तू मुलगी म्हणून नको होतीस. तुझ्या आईला तूला जगताना पहायची ओढ होती. तिने तुला जे नाव दिले त्या नावाने आजही ती तुला ओळखावी आणि तिच्या स्वप्नांना पूर्णता मिळावी. हीच माझी इच्छा होती. माती, यासाठीच मी तुझे नाव नाही बदलले.
आपले मुल ज्या दिशेने धावते ती आईसाठी प्रकाशाची दिशा असते. मुल दिसानसे झाले कि मागे उरतो तो फक्त काळोख." मोठा नि:श्वास सोडत आजी एक क्षण थांबली आणि परत सांगू लागली "माझा प्रकाश एका वादळात हरवून गेला. शेवटचे पहिले तेव्हा तुझ्याच वयाची असतील माझी मुले." आजीच्या डोळ्यातून पाणी आले. माती पुढे आली आपला आधार द्यायला. आजी म्हणाली" आपण एकटेच असतो, पण फ़क़्त तोपर्यंत जोपर्यंत आपण कोणाचा एकटेपणा दूर करत नाही." अश्रू लपवत पुढे म्हणाली" ज्या क्षणी मी एकटी झाले त्या क्षणी मी ठरवले, कोणालाही मायेची गरज आहे त्यांना हात द्यायचा. बघत बघत अनेक मुले जोडली गेली. आता ती सारी शिकून मोठी झाली आहेत. आज बघ माझा हात तुझ्या हाती आणि तुझे हात अजून कोणाच्या हाती देशील तर जग प्रेमाने भरून जाईल"
मातीने आजीला वचन दिले कि ती तिच्यातील माणुसकी जपेल. माणुसकीला प्रेमाने गुणले आणि व्देशाला मायेने भागले तर जग कित्ती सुंदर होईल, हो न?