Saturday, November 28, 2015

रंगीलो राजस्थान-2

          शुभ संकेत म्हणावा तसा वाघोबा समोर येउन दर्शन देऊन गेला! मुंबई मधून समुद्राचे धडे घेऊन गेलेलो आम्ही रणथम्बोर मध्ये खरी थंडी ते काय याची मजा घेत होतो. पहाटेच्या धुक्यामध्ये फोटो काढत आमचा ताफा 'destination Jaipur '  निघाला. गावातील रस्ते  पावसामुळे रुसले होते आणि खड्ड्यामुळे आम्ही धक्यावर धक्के खात होतो. पण खिडकीतून दिसणारी झाडे, पोपटांचे थवे , मोर आणि धुक्यामधून हळूच डोकावणारी सूर्याची किरणे मोहक दिसत होती. अश्या वातावरणामध्ये बस थांबवून पेरू खरेदी नाही केली तर काय केले :)
असे अजून काही स्वदिष्ट break घेत आम्ही गुलाबी थंडीत, गुलाबी शहरामध्ये प्रवेश केला.
          सुंदर जागा, सुंदर सहप्रवासी आणि आता हुशार guide  ची भर पडली होती. जयपूरच्या गल्ली-रस्त्यांवरून जाताना येथील राजांचा वैभाशाली इतिहास रंगतदार बनला तो लहान मोठ्या किस्स्यांनी, जसा कि 'सवाई' हि पदवी येथील राजांना कशी मिळाली, पिंक सिटी च्या पिंक रंगाचा इतिहास, राजा सवाई जयसिंग यांच्या हुशारीचे किस्से, राजा सवाई मानसिंग यांच्या कर्तबगारीचे किस्से एकत होतो. संपूर्ण शहराची रचना वास्तुशास्त्रा नुसार केली आहे. आम्ही नवीन आणि जुने जयपूर मधील हवामहाल, SMS  नावाने सुरु होणार्या इमारती, राजस्थान मधील गरीब (?) लोकांचे बंगले, जंतर-मंतर डोळ्यांना सुख आणि डोक्याला विचारांचे चांगलेच खाद्य मिळत होते. संध्याकाळ झाली तशी सूर्याची नारंगी-जांभळी किरणे गारवा घेऊन बिरला मंदिर मध्ये चं रमली होती. अतिशय सुभक आणि विचार्पुवक केलेले कोरीव काम, जणू काही पारदर्शक वाटावा एवढे सुंदर संगमरवरीमध्ये केलेले काम! डोळ्यात ते सगळे साठवता साठवता आम्ही चार क्षण तिथे विसावलो. मंदिरामागे दिसनरल मोती डोंगरी आणि सुंदर गणपती बाप्पा , सारे काही योग्य त्या वेळी घडत होते. अजून एक आठवणीतील अनुभव म्हणजे आम्ही ज्या hotel  मध्ये थांबलो होतो तेथील rotating deck वरील जेवणासोबत आमची गझलमुळे सुरमयी झालेली रात्र. दिवसभर आम्ही जयपूरची प्रदक्षिणा करत होतो आता रात्री सारे जयपूर आमच्याभोवती फिरत होते
        नवीन दिवस सुरूर झाला तो इतिहासातील अजून एक वास्तू पाहण्याचा-आमेर फोर्ट. सुंदर आवर, राजेशाही संगीत आणि डोलत चालणारे हत्ती, आमेर फोर्ट मधील ती सकाळ वेगळाच अनुभव देऊन गेली. लोकांनी इतिहासातून शिकावे हे खरे पण काय शिकावे हा ज्याचा त्याचा भाग आहे. येथील राजाला १२ राण्या होत्या-प्रत्येक राशीची एक बयको. राणी म्हणे जेह्वा राजासाठी तयार होत असे तेह्वा एवढे अलंकार आणि वेशभूषा करायची कि तिला दासी एका खास मार्गाने व्हील chair ने राजाकडे घेऊन जात असत. आम्ही यात रमून गेलो कि काय ते वैभव, यांचा summer palace  काय , सुंदर ती बाग काय, आरश्यांचे सुंदर नाजूक काम असो वा चतुराई ने केलेली संगमरवरील नक्षीकाम! पण आमचे अवलिया बाबा यांनी १२ राण्यांचे जरा जास्तच मनावर घेतले होते. एवढा दिलखुलास आनंद एकट्याने थोडाच कमावता येतो, याला तशी दिलखुलास मंडळी हवीच. आम्ही देखील मग अवलिया बाबांच्या मोहिमेत त्यांना मदत करायची ठरवली :)
          आता वेळ होती ती जगातील एकमेव ब्रम्ह देवाचे मंदिर पाहण्याची. कळलाव्या नारदाची कथा ऎकलि आणि  शांत पुष्कर मध्ये आम्ही मंदिरात दर्शन घेतले. आता पर्यंत सारे सहप्रवासी होते आता वेळ होती ती अजून एकमेकांना जाणून घेण्याची. मस्त camp fire च्या प्रकाशात सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. या प्रवासात अजून काय ते शुभ आशीर्वाद जोडायचे म्हणून आम्ही निघालो ते अजमेर कडे . मोहमाद्दिन चिश्ती यांच्या दर्गः चे दर्शन घेतले. इथे अजूनही दर्गा ला जाण्यासाठी तंग्यामधून जावे लागते. अध्यात्मा कडून परत इतिहासामध्ये जायची मनाला आता ओढ लागली होती ती चित्तोडगढची. इतक्या कथा आणि किस्से एकले होते या अमर वस्तूचे कि मनाची उत्सुकता वाढली होती. 'चित्तोडगढ' नाव जसे भारदस्त तसे असे वाटत होते तेथील मातीचा प्रत्येक कण  स्वाभिमान, मातृभीचे प्रेम, खंबीर आणि संस्कृतीला, प्रजेला जपणाऱ्या राजाला विनम्रतेने सलाम करत होते. 
जो भरा नहि हें भावोंसे, 
भेहती जिसमे रसधार नहीं,
वो हृदय नहीं वो तो पत्थर हें,
जिसमे अपने स्वदेश का प्यार नहीं  
अश्या खड्या आवाजात guide ने भावपूर्ण कवितेने चित्तोडगड च्या इतिहासाची  प्रस्तावना मांडली .आमचा प्रत्येक श्वास, तेथील प्रत्येक क्षण इतिहासामध्ये मिसळून जात होता. चित्रांगदा मौर्य(मोरी) ने ठेवलेल्या पहिल्या पावलापासून चित्तोडगढची सुरुवात झाली. किती तरी चढउतार पाहून धैर्याने मान ताठ करून विजय स्तंभ अभिमानाने शांत उभा होता.  तेथील प्रत्येक वास्तूची कथा आमचे guide जिवंत करून सांगत होते.पद्मावतीची सौंदर्याची कथा त्यातून आन-बाण जपण्यासाठी निर्माण झालेली युद्ध, जोहर, पन्नाबाई च्या बलदानाची कथा, महाराणा प्रतापच्या शौर्याची कथा मनाला भिडत होती. जणू वाटत होते हे सारे आत्ता आमच्या समोर घडत आहे . मीराबाईच्या श्रीकृष्ण भक्तीमध्ये तृप्त झालेली भजने एकत सुर्य मावळला. चित्तोडगढ वरील प्रत्येक क्षण तो दिवस अवस्मरणीय!      
रणथम्बोर, जयपूर , आमेर, पुष्कर, अजमेर, चित्तोडगढ! दिवसेंदिवस प्रवास अधिक मनमोहक होत होता. आता next destination उदयपूर! 

          

1 comment:

Sneha said...

Tuzya barobar me hi Rajasthan phirun aale ahe ase vattay. Apratim.